सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Saturday, August 11, 2012

या अल्ला.. कर मदद !!!

आज आमची मुंबापुरी धन्य धन्य झाली. आमची तर शत जन्माची पुण्याई फळली. म्हणूनच हे वृत्त लिहिण्याचा योग आम्हास अनुभवता आला. 

आमच्या शहराच्या दक्षिणेस आझाद मैदान नामक तीर्थस्थान आहे. कोणे एके काळी जेव्हा आपला देश नेहरू-गांधींच्या ताब्यात नव्हता... तर ब्रिटीश नावाच्या पाकिस्तानची राजकीय गणिते जमवणाऱ्या महानुभावांच्या झेंड्याखाली होता.. तेव्हा इकडे स्वत:ला स्वातंत्र्यप्रेमी का कायसे म्हणवणारे मूढ लोक त्यांना विरोध करण्यासाठी जमायचे म्हणे.

आता या भाकडकथा इतिहासाच्या पुस्तकातील एका कधीही न उघडलेल्या पानात लपलेल्या असतात. पण हा अपवाद वगळता येथे अनेक चांगली कृत्ये सुद्धा होतातच की !!

तर अशाच एका यज्ञाचे आयोजन या पवित्र तीर्थक्षेत्री करण्यात आले होते. मुंबई आणि आसपासच्या इलाक्यामधील सुमारे ५० हजार तीर्थंकर या निमित्ताने आझाद मैदानावर आले होते. विश्वबंधुत्वाचे (सभी मुस्लीम भाई-भाई) सूत्र न समजलेल्या सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी रझा अकादमीच्या आयोजकांनी हा यज्ञ योजला होता.

बराच खल करून शेवटी असे ठरले की, साध्वी प्रज्ञासिंह नामक आसुरी महिलेला तुरुंगात डांबणारे आणि अजमल कसाब नामक फकिराला रोज बिर्याणीचा प्रसाद दाखवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा या यज्ञात सक्रिय सामील होऊ द्यायचे. आता यज्ञ म्हटला म्हणजे आहुती आलीच. तेव्हा पोलिसांनी आपल्या काही गाड्या आणि मुंबई महापालिकेने आपल्या काही बस या यज्ञात आहुती म्हणून अर्पण करून थोडेसे पुण्य संपादले.      

पुढे प्रसाद वाटपाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला तेव्हा एकच झुंबड उडाली. पण अंदाजे ३६ पोलिसांनी आणि ३ पत्रकारांनी अश्म रूपी प्रसादाचा लाभ घेतल्याचे कळले. 


कोणत्याही यज्ञ समारंभात कीर्तन-प्रवचन हवेच. येथेही त्यासाठी अनेक विद्वान महर्षी सादर आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सुद्धा "इस्लाम खतरे में", अशी हाळी देत आसाममध्ये सुरू असलेल्या धर्मयुद्धात शहीद झालेल्या वीरांच्या कहाण्या श्रोत्यांना ऐकवल्या. इतकेच नव्हे तर जगातील एकमेव ‘पाक’ राष्ट्राचे ध्वज येथे मोठ्या अभिमानाने मिरवत काफरांचे प्रमुख वसतीस्थान असलेल्या भारताची त्यांनी यथेच्छ निंदा करून बराच पुण्यसंचय केला. हे कीर्तन इतके रंगले की, येथे उपस्थित असलेल्या २ पीरांनी जागीच समाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील काही नास्तिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. अखेर पैगंबरांनी यातील एका पीराला खास आपला दूत पाठवून मोठ्या मिरवणुकीने जन्नतमधे प्रवेश दिल्याचे सूत्रांकडून समजते.



विशेष म्हणजे हा एवढा मोठा यज्ञ आयोजित करण्यात आल्याचे अनेकांना माहीतच नव्हते. याचा निषेध म्हणून नेहमीच नि:पक्ष आणि निर्भीड वार्तांकन करून संघ-बजरंग दलाचे कथित कारनामे लोकांसमोर आणणाऱ्या प्रसारमाध्यमांना यावेळी मोठ्या खेदाने लक्ष्य करावे लागले. पण त्या निमित्ताने आयोजकांना आपल्या बांग्लादेशी नामक सुहृदांना न्याय दिल्याचे मोठे समाधान लाभले.    

अहो.. आज आपला देश रडत-खडत का असेना; पण जगाच्या राजकारणात अतिशय महत्वाची (या वाक्यावर  मला उगाच ठसका लागला) भूमिका बजावत आहे. मात्र याच देशाच्या सुदूर पूर्वेकडे असलेल्या आसाम नामक राज्यात मोठ्या मुश्किलीने सीमा पार करून दाखल झालेल्या काही शरणार्थींना खुलेआम ठार मारण्यात येते. पण कोणाचेच तिकडे लक्ष जात नाही. सगळे वेडे त्या बोडो नामक जंगली जमातीसाठी गळे काढत असताना या विषयाकडे कोणाचे लक्ष जाणार?

पण नाही. ज्यांचा राम नसतो.. त्यांचा अल्ला असतो !! अल्लाच्या बंद्यांनी आझाद मैदानावर नेमके हेच सिद्ध  केले. पूर्वी पाकिस्तानच्या टाचेखाली चिरडलेल्या आणि आता स्वकीयांच्याच अत्याचारांना कंटाळलेले काही शरणार्थी बांगलादेश नामक नरकातून भारतात दाखल होतात. त्यांना रोजीरोटी आणि निवारा देण्याचे सोडून त्यांच्या नावाने गळे काढणारेच या देशात जास्त आहेत.

निष्पाप असे हे बांगलादेशी भारतीय चलनात थोड्याशा स्वनिर्मित चलनाचा पुरवठा करून अर्थव्यवस्थेला मजबूत करणे, युवा पिढीला अखंड दिवास्वप्ने दाखवणारी अंमली औषधे गरजूंना पुरविणे, या देशात क्रांतीकार्य करू पाहणाऱ्या नक्षलवादी आणि इतर अतिरेकी संघटनांना शस्र पुरवठा करणे आदी अनेक सत्कृत्ये करतात. भारताच्या विकासात एवढे अमूल्य योगदान देणाऱ्या या मंडळींचा पाहुणचार करणे राहिले बाजूलाच.. पण अडाणी बोडो त्यांना ठार मारत असताना मूकपणे पाहणे हे सरकारला विशेषत: महाराणी सोनिया आणि युवराज राहुल यांच्या सरकारला शोभते काय?

नेमक्या याच मुद्याचे गांभीर्य सरकारला जाणवत नव्हते. पण आजच्या या यज्ञामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा मानवतावादी चळवळ पुढे जाणार आहे. गेले कित्येक दिवस मौनात असलेल्या कुमार केतकर, तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, शरद पवार, मुलायमसिंह यादव आदी मानवतावादी ऋषीजनांना जणू संजीवनी मिळणार आहे. हे एवढे पवित्र कार्य आम्हा पामर मुंबईकरांच्या दारी झाले, यातच आपण आनंद नाही का मानणार???