सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Thursday, November 5, 2009

"वंदे मातरम्" ला विरोध कशासाठी??


"वंदे मातरम्" ला विरोध कशासाठी??

गेले काही वर्ष आमच्या गांधी प्रणित अहिंसावादी देशात वैचारिक हिंसा सुरु आहे. जागतिक इतिहासाच्या अग्रभागी झळकणाऱ्या काही संघर्षात 'भारतीय स्वातंत्र्यलढा' अगदी ठळकपणे दिसतो. अनेक पाश्चात्य व काही भारतीय पंडितांच्या मते हा संघर्ष अवघा १५० वर्षच चालला. इंग्रजांनी भारतात आपले पाय रोवून सत्ता हस्तगत केली त्यानंतरच म्हणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली, आणि १९४७ साली भारत स्वतंत्र झाला !!

हा इतिहास खोटा आहे अस नाही पण अर्धसत्य नक्कीच आहे. मुळात पारतंत्र्याची व्याख्या स्पष्ट असली म्हणजे, स्वातंत्र्याचा अर्थ समजणे सोपे होते. परकीयांचे शासन हीच पारतंत्र्याची व्याख्या असेल तर सुलतान व मुघल भारतीय वंशाचे होते काय? सिद्दी, विजापूरकर आदिलशहा, निजामशाहा यांचे पूर्वज भारतीय होते काय? मग त्यावेळी आम्ही स्वतंत्र होतो हे तरी कसे मान्य करायचे? बर जुलमी शासनसंस्था हा पारतंत्र्याचा निकष असेल तर अल्लाउद्दिन खिलजी पासून औरंगजेबापर्यंतच्या सम्राटांनी असे काय पराक्रम केले की त्यामुळे आपण मानावं की आम्ही त्यावेळी स्वतंत्र होतो?

या इतिहासातच आमच्या अध:पतनाची खरी बीजे रोवली आहेत. आमचा खरा स्वातंत्र्यलढा सुरु केला, तो विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क या 'आमच्या राजांनी'. त्यांचा वारसा पुढे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला!! मात्र आमच्या सध्याच्या शासन व्यवस्थेचे शिल्पकार पंडित (?) नेहरू यांना मात्र हे महापुरुष वाट चुकलेले देशभक्त वाटले. "यथा राजा, तथा प्रजा" या न्यायाने सध्याच्या पिढीलाही काहीसं असचं वाटू लागलंय. नाहीतर "वंदे मातरम्" धर्माच्या आड येते असे सांगून या राष्ट्रगीताला विरोध करणाऱ्यांना इतके धैर्यच झाले नसते.

सध्या आपण म्हणत असलेले "वंदे मातरम्" हे गीत खरे ६ कडव्यांचे आहे. भारतमाता ही प्रत्यक्ष दुर्गामाता आहे असे मानून तिच्या गुणांची स्तुती या गीतात केली आहे!! दुर्गामाता असुरांचे (खल प्रवृत्तीचे) निर्दालन करते अशी हिंदू बांधवांची श्रद्धा आहे. पुराणातले असूर आणि सध्याच्या भारतीय मुसलमानांचे पूर्वज आणि ते स्वत: यांच्यात असलेल्या कमालीच्या साधर्म्यामुळेच ते "वंदे मातरम्" या गीताला विरोध करत असावेत का असा प्रश्न निर्माण होण्यास चांगलाच वाव आहे.

ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचे पालनपोषण करते, अगदी त्याचप्रमाणे ही भारत नामक पुण्यभूमी देखील आम्हाला आधार देते, आमचे पालनपोषण करते. जर तिला मातेसमान मानून तिची स्तुती केली तर कोणाच्या (अगदी देवाच्या सुद्धा) पोटात दुखायचे काय कारण? पण आमच्या भारतीय मुसलमानांच्या पोटात दुखतंय!! ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर इलाज करायचे ते तर स्वत:च बेजार आहेत.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनप्रसंगातली एक गोष्ट आहे. जपान मार्गे अमेरिकेकडे रवाना होत असताना स्वामीजींची काही प्रवचने टोकियो शहरात सुद्धा झाली. शहरातले प्राचीन, भव्य असे बौद्ध पेगोडे पाहून अतिशय प्रफुल्लीत झालेल्या विवेकानंदांनी जपानी युवकांसमोर झालेल्या एका भाषणानंतर त्यांना प्रश्न केला, " तुम्ही सगळे अहिंसावादी बुद्धाचे अनुयायी आहात. मात्र जर तुमच्या देशावर परकीयांचे आक्रमण झाले तर तुम्ही काय कराल? त्या तेजस्वी तरुणांनी तत्काळ उत्तर दिले, इथे असलेल्या सगळ्या बुद्ध मूर्ती धातूच्या आहेत. आम्ही त्या वितळवून त्यांची शस्त्रे बनवू, आणि त्या आक्रमकांचा पराभव करू." या उत्तराने विवेकानंद सुद्धा अचंबित झाले. काय ही राष्ट्रनिष्ठा ?? जिच्यापुढे प्रत्यक्ष देव सुद्धा नगण्य ठरावा?

खरे तर भारतीय मुसलमानांचे पूर्वज मूळ भारतीय (हिंदू), या सगळ्या मुसलमानांना आमच्या देशाचाच आधार आहे. मग देशाचे गुणगान करताना यांना लाज वाटण्याचे काय कारण? देशाची स्तुती केल्यामुळे जर तुमच्या धर्माचा अपमान होत असेल तर तुमचा धर्म इतका लहान आहे असे दिसते. इस्लामच्या आधारावर जन्माला आलेल्या पाकिस्तानकडे ही मंडळी उघड्या डोळ्यांनी का पाहत नाहीत? तालिबानींच्या हातून मरणाऱ्या अल्लाच्या बंद्यांना आज स्वतःच्या जीवितासाठी अवलंबून राहावे लागते ते, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या ख्रिस्ती देशांवरच आणि यांना मारणारे असतात तालिबानी. जे स्वतःला अल्लाहचे प्रचारक म्हणवतात!! या भारताने आपल्याला काय कमी दिले, याचा विचार इथे राहणारे मुसलमान केव्हा करणार? खर तर डोळ्याला झापड लावून फिरणाऱ्या या मुर्खांना सत्याची जाणीव करून द्यायची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण त्याच शासनाचे गृहमंत्री जेव्हा "वंदे मातरम्" ला विरोध करणाऱ्यांच्या मंचावरून आपल्या अकलेचे ओंगळवाणे प्रदर्शन करतात, तिकडे दोष कोणाला द्यायचा?This Article is Published by 'Tarun Bharat, Mumbai.'

2 comments:

  1. Chan Surekh lekh ahe.. Abhinandan... ani hardik shubhecchaa...

    ReplyDelete
  2. उत्तमच!
    नविन सुरवात तर छान झाली. पण रोज लिहिण्याची सवय लावणे महत्वाचे आहे. तुझ्या सारख्या ह्याच क्षेत्रात असणार्‍याला ते अवघड नाही. सगळे काही कुठे छापले जाण्याची गरज नाही. पण आपले विचार तितक्या स्पष्टपणे लिहणे हे ही महत्वाचे तेही योग्य भाषेत!!
    पुन्हा एकदा शुभेच्छा ब्लॉग सुरु केल्याबद्दल आणि अभिनंदन !!

    ReplyDelete