केंद्रिय गृहमंत्री
राजनाथ सिंह यांनी आज संसदेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केल्यामुळे
काँग्रेसच्या भाटांना अतिशय अस्वस्थ वाटत असल्याचे सोशल मीडियावर दिसते आहे.
त्यांच्यामते हिंदू धर्मातील 'असहिष्णू'तेला कंटाळूनच आंबेडकरांनी धर्मांतर केले. त्यामुळे भाजपवाल्यांना
आंबेडकरांचे नाव वापरायचा अधिकार नसल्याचे काँग्रेसभाटांचे म्हणणे आहे.
त्यांच्याकरिता काही प्रश्न....
१.
आंबेडकरांना हिंदू धर्मातील कुप्रथांबद्दल राग होता हे मान्य. पण इस्लाम आणि
ख्रिश्चन धर्माबद्दल आंबेडकरांना काय वाटत होते?
२. इस्लामी आणि ख्रिस्ती
धर्मगुरूंनी दाखवलेली आमिषे फेटाळून डॉ. आंबेडकरांनी भारतीय मातीत जन्मलेला बौद्ध
धर्मच का स्वीकारला?
३.
गेल्या ६० वर्षांचा इतिहास पाहताना धर्मांतरणामुळे दलित समाजाला त्यांचा
आत्मसन्मान खरोखरच मिळाला का?
४.
विशेषतः खैरलांजीसारख्या घटना घडल्यावर काँग्रेसच्या तत्कालीन राज्य आणि केंद्रिय
नेतृत्वाने सामाजिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी नेमकी काय पावले उचलली?
५.
समान नागरी कायद्याबद्दलची डॉ. आंबेडकर यांची मते काँग्रेसला मान्य आहेत का? या संदर्भातील एखादे विधेयक सत्ताधाऱ्यांनी संसदेत आणले तर काँग्रेस
त्याला बिनशर्त समर्थन देणार का?
६. डॉ.
आंबेडकरांनी आरक्षण धोरणाच्या कालमर्यादेची गरज व्यक्त केली होती. या विषयावर
निकोप चर्चा करण्याची काँग्रेसची तयारी आहे का?
७.
असहिष्णुतेचा सध्याचा विषय ज्या गोहत्येच्या मुद्यावरून समोर आला, त्या गोहत्येबद्दल डॉ. आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रातः स्मरणीय महात्मा
गांधी यांना नेमके काय वाटायचे?
८.
पुणे कराराबद्दल काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाला काय वाटते?
-
प्रणव भोंदे
No comments:
Post a Comment