सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Wednesday, April 2, 2014

सरसंघचालकांचे काय चुकले??

  २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूक काळात वार्ताहर या नात्याने मुशाफिरी करताना प्रभादेवी परिसरातील एका मराठीप्रेमी राजकीय पक्षाच्या संपर्ककेंद्रावर गेलो होतोतेथे बसलेल्या काही तरूण कार्यकर्त्यांपैकी एकाकडून त्यांच्या पक्षाच्या प्रचाराची आणि मतदारांच्या प्रतिसादाची वास्तपुस्त करून तेथून निघालोसायंकाळी माहीम मच्छीमार वसाहतीत भटकंती सुरू असताना तेथे आणखी एका मराठीप्रेमी पक्षाचे मतदार संपर्ककेंद्र होतेहा पक्ष नव्यानेच स्थापन झाल्यामुळे आणि त्या निवडणुकीत या पक्षाची बऱ्यापैकी हवा असल्यामुळे साहजिकच त्या केंद्रावर कार्यकर्ते आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होतीमी सुद्धा त्या गर्दीत सामील होऊन आत शिरल्यावर दुपारी प्रभादेवीला भेटलेला तो तरूण कार्यकर्ता येथे सुद्धा दिसला.
           ते दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्या युवकाला दोन्ही केंद्रांवर सक्रिय असल्याचे पाहून मला मोठा धक्का बसला होतात्यानेही मला ओळख दाखविल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याशी बातचीत सुरू झालीराजकीय विश्लेषणासाठी पुरेशी माहिती मिळाल्यावर मी दबकतच माझ्या मनात असलेली शंका त्याला विचारलीएकाच वेळी दोन प्रतिस्पर्धी पक्षांच्या प्रचारात तू कसा काय सामील होऊ शकतोसया माझ्या प्रश्नावर त्याने माझ्या डोळ्यात वास्तवाचे अंजन घालणारे उत्तर दिलेतो म्हणाला कीमी सध्या माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो आहेया दोन्ही पक्षांच्या विद्यार्थी शाखा माझ्या महाविद्यालयात देखील असूनमाझे अनेक मित्र त्यांच्यात सक्रिय आहेतनिवडणूक काळात या सर्वच पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते हवे असतातत्यासाठी ते आम्हाला एकवेळचे चमचमीत जेवण आणि बऱ्यापैकी  मानधन सुद्धा देतातयेथे काही दिवस काम केल्यामुळे माझ्या पुढच्या काही आठवड्यांच्या खर्चाचा प्रश्न सुटणार असल्यामुळे घरी बसून राहण्यापेक्षा मी दोन्ही ठिकाणी काम करणे पसंत करतो
          त्या युवकाने अगदी प्रामाणिकपणे माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होतेअतिव्यस्त वेळापत्रक असलेल्या मुंबई महानगरीतल्या बहुतेक सर्वच पक्षांना अशा कार्यकर्त्यांचा आधार घ्यावा लागत असतोअर्थात या पक्षांमध्ये सक्रिय असलेले सर्वच कार्यकर्ते असे भाडोत्री नसलेतरी  जवळपास प्रत्येक कार्यकर्ता काहीना काही अभिलाषा बाळगूनच राजकारणात उतरलेला असतोहे वास्तव सर्वपक्षीय नेते खाजगीत व्यक्त करतात.
           राजकीय क्षेत्र हे समाजाच्या सर्वच अंगांना प्रभावित करणारे सर्वंकष क्षेत्र आहेसत्तेतून मिळणारा अधिकारअवाढव्य प्रशासकीय यंत्रणाविविध स्त्रोतांतून प्राप्त होणारा महसूल आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्वसाधारण जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणेनिश्चितच शक्य असतेपण वास्तव काहीसे वेगळे आहेइतिहास व वर्तमानातील काही सन्माननीय अपवाद वगळता सत्ताकेंद्राकडून बहुतेकदा जनतेचा अपेक्षाभंग होतोत्यातून अनुभवास येते ती केवळ चीड आणि हताशानक्षलवाद्यांसारखे समाजविघातक घटक स्थानिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नेमके असेच मुद्दे वापरतात.
           काही महिन्यांपूर्वी देशातील चार महत्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्याकेंद्रातील सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष आणि मुख्य विरोधी असलेला भारतीय जनता पक्ष यांची लोकसभा निवडणुकीपूर्वीची सराव परीक्षा म्हणून सर्वांचेच या निवडणुकांकडे लक्ष होतेइतर तीन राज्यांत अपेक्षेप्रमाणे लढती झाल्या असल्या तरी राजकीय अभ्यासक व सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले ते दिल्ली राज्यातील निवडणुकीच्या निकालानेदेशाचे सत्ताकेंद्र असलेल्या या राज्यात आम आदमी पक्ष नावाच्या नव्या भिडूने अनपेक्षित चमत्कार घडवून चक्क स्वतःचे सरकार स्थापन केलेया पक्षाला पहिल्याच फटक्यात मिळालेले हे नेत्रदीपक यश पाहूनकॉंग्रेसभाजपासह देशातील सर्वच जुन्याजाणत्या पक्षांचे धाबे दणाणलेया पक्षाने लोकांच्या मनातील मुद्यांना हात घालूनत्यांच्या अपेक्षा वाढविल्या होत्यासर्वसामान्यांना भेडसावणा-या समस्यांवर नेमके बोट ठेवूनत्या दूर करण्याचे वचन दिले होतेपण अनेक नाटकीय घडामोडींनंतर अवघ्या ४९ दिवसात हे सरकार कोसळले आणि त्या पक्षाकडे आशेने पाहणा-यांची घोर निराशा झाली.
                आता त्या पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशभर प्रचाराची राळ उडविली आहेत्यांचा असा दावा आहे कीकॉंग्रेस-भाजपासहित देशातील सर्वच प्रस्थापित पक्ष भ्रष्ट आहेतया पक्षांची सत्तासंचालनात एकमेकांसोबत मिलीभगत असल्यामुळे जनतेची घोर फसवणूक होत आहेहे सर्वच पक्ष आपापली संस्थाने राखण्याचे काम करीत असूनआम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे त्यांचे लक्षच नाहीतेव्हा ही भ्रष्टाचारी यंत्रणा समूळ नाहीशी करूनलोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी जनतेने आम आदमी पक्षाची निवड करावीअसे त्यांचे सांगणे असतेकेजरीवालांच्या वरील कथनातील पूर्वाध जरी खरा असला तरी उत्तरार्धाबद्दल राजकीय अभ्यासकांत सुद्धा दुमत आहेया पक्षाची स्थापना ज्या जनलोकपाल आंदोलनातून झालीत्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अण्णा हजारेंपासून अनेकांनी या पक्षाच्या ख-या उद्देशाबद्दलच शंका व्यक्त केली आहेलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जसजसा रंग भरतो आहेतसतसा आप नावाच्या या पक्षाने आम्हीही इतर पक्षांपेक्षा तसूभर देखील कमी नाहीहे सिद्ध करण्याचा जणू विडाच उचलला आहेपरिणामी विवेकी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असूनसगळेच पक्ष सारखे असल्याच्या त्यांच्या पूर्वसिद्धांतावर नव्याने शिक्कामोर्तब होत आहे.
           याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशव्यापी संघटनेचे प्रमुख असलेले सरसंघचालक डॉमोहन भागवत यांचे एक विधान गाजते आहेत्यांनी संघाच्या देशभरातील प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले कीआपण सर्व कार्यकर्ते कोणत्याही राजकीय पक्षासाठी नव्हे तर देशहितासाठी काम करीत असल्याची जाणीव सतत मनात ठेवली पाहिजेनिवडणूक मोसम संपल्यानंतर आपण सर्वांनीच पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रउभारणीच्या कामाला जुंपून घ्यावयाचे आहेनिवडणूक काळात संघप्रमुखांनी केलेल्या या वक्तव्याला खमंग फोडणी देऊन काही प्रसारमाध्यमांनी सरसंघचालकांनी हे वक्तव्य भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना उद्देशून केल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यामोदींच्या एककल्ली प्रचाराचा नकारात्मक प्रभाव संघ कार्यकर्त्यांवर देखील पडत असल्यामुळेच त्रस्त झालेल्या संघाने असे वक्तव्य केल्याचे तर्क यानिमित्ताने अनेक राजकीय विद्वांनानी मांडलेपण डॉभागवतांचे वरील वक्तव्य नीट वाचले तर कोणत्याही विेवेकी वाचकाला या सर्व परिस्थितीचे निराळ्या पद्धतीने आकलन व्हावे.
           राजकारण हे समाज घडणीचे मूलभूत माध्यम असूच शकत नाहीकिंबहुना सामाजिक प्रगल्भतेचे पारदर्शक व वास्तविक चित्र राजकारणाच्या पोतावरून उमटत असतेस्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संसदेत आणि महाराष्ट्र व इतर अनेक राज्यांच्या विधीमंडळाचे सदस्य असलेल्या अनेक नेत्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांतून तत्कालीन भारतीय जनतेच्या अपेक्षा लोकशाहीच्या या दालनांत मोठ्या प्रभावीपणे मांडल्यामधू लिमयेमधू दंडवतेअटलबिहारी वाजपेयीबॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळजॉर्ज फर्नांडीस आदी नेत्यांनी संसदेच्या इतिहासावर आपला अमीट ठसा उमटविला आहेमहाराष्ट्राच्या विधीमंडळानेही अशी समृद्ध व सकस नेत्यांची परंपरा जपली आहेआचार्य अत्रेरामभाऊ म्हाळगीऍडदत्ता पाटीलउल्हास पवार या नेत्यांची भाषणे ही केवळ बिनतोड युक्तीवाद किंवा उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमूना नव्हतीतर त्यात राज्यातील जनतेच्या ख-या समस्यांची सांगोपांग चर्चात्यांचे परिणामसंभाव्य उपाययोजना यावर मार्मिक भाष्य केलेले असे.
   वरील दोन्ही याद्या नीट पाहिल्या तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते कीवरील सर्व नेते कोण्या एका पक्षाचे नसूनसर्वच पक्षांनी असे नेतृत्व घडविले होतेमग गेल्या काही वर्षात असे नेते लोप पावले कायकेवळ राजकीय क्षेत्रातच असे अधःपतन घडले आहे की इतर प्रभावी क्षेत्रांतही तेच चित्र आहे़वरील प्रश्नांचा साकल्याने विचार केला तर याचे नेमके उत्तर सापडतेगेल्या काही वर्षात साहित्यशिक्षणपत्रकारिताकायदा आदी सर्वच क्षेत्रांमध्ये अशीच एक पोकळी पाहावयास मिळतेकदाचित या सर्व क्षेत्रांचे अंधपणे होणारे व्यावसायिकरणच याला जबाबदार असावेचांगली माणसे घडविण्याचीसमाजजागृती  करण्याची अथवा अपप्रवृत्तींना आळा घालण्याची आपली पूर्वापार यंत्रणा क्षीण झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे.

 केवळ क्रांती घडल्यामुळे समाजाची सर्व स्वप्ने साकारत नसतातत्यासाठी पक्की यंत्रणा उभारण्याची व ती सक्षमपणे राबविण्याची नितांत गरज असतेएखादा नेताराजकीय पक्ष किंवा आंदोलन यांच्या माध्यमातून आपली सगळी स्वप्ने पूर्ण होतील असा भाबडा अंधविश्वास बाजूला ठेवून समाजालाच आपल्याला अपेक्षित सुधारणांचा कृती आराखडा आखणे गरजेचे बनतेयंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी आपापल्या मतदारांना गोंडस स्वप्ने दाखविली आहेतउद्या ही स्वप्ने पूर्ण करणे या पक्षांना अपयश आल्यास जनतेचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतोत्यातून नैराश्य येऊन परिस्थिती आणखी चिघळू शकतेया देशाची आणि समाजाची चिंता असलेल्या प्रत्येकालाच हे जाणवत असेलतेव्हा सरसंघचालकांनी त्याला उघड वाचा फोडली हे बरेच झाले.


No comments:

Post a Comment